MPSC चे विद्यार्थी पुन्हा आक्रमक; या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची तयार राज्यातील लाखो तरुण करत असतात. अगदी आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष सरकारी नोकरीसाठी आणि MPSC परीक्षा पास करण्यासाठी हे विद्यारही घालवत असतात.
मात्र गेल्या काही वर्षांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे. तसंच गेल्यावर्षी पुण्यातील MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपासून MPSC बद्दल विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. काही दिवसांपूर्वी MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. आता आज संपूर्ण राज्यभरातील MPSC चे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेऊया.
काही दिवसांपूर्वी MPSC नं परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आणि सिलॅबसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये MPSC चा संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. मात्र यावर कित्येक वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
तसंच गेल्या कित्येक वर्षांपासून MPSC च्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. उत्तर पत्रिकेत घोळ किंवा प्रश्नपत्रिकेत चूक होत आहे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत म्हणूनच अशा प्रकारांवर MPSC नं लक्ष द्यावं अशीही मागणी विद्यार्थी करत आहेत. तसंच आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू अशी भूमिका घेणारं ट्विट MPSC नं केलं आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे मान्य केलं जाणार नाही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तसंच MPSC विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेत माही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.