उत्तर प्रदेश ; भाजपचे ज्येष्ठ नेते केशरीनाथ त्रिपाठींचं निधन ; 3 वेळा भूषवलं होतं विधानसभेचं अध्यक्षपद…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रयागराज (उत्तर प्रदेश) :- केशरीनाथ त्रिपाठी हे गेल्या वर्षी 8 डिसेंबरला बाथरूममध्ये घसरुन पडले होते. या कारणामुळं त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं, तेव्हापासून त्यांनी खाणंपिणं बंद केलं होतं.
उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचं निधन झालं. ते बरेच दिवस आजारी होते.
प्रयागराज येथील राहत्या घरी आज पहाटे 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशरीनाथ त्रिपाठी हे भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते होते. यूपीच्या राजकारणात त्यांची वेगळी ओळख होती. मुलगा नीरज त्रिपाठी यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिलाय. नीरज त्रिपाठी यांनी सांगितलं की, ‘वडिलांवर घरी उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’
केशरीनाथ त्रिपाठी हे गेल्या वर्षी 8 डिसेंबरला बाथरूममध्ये घसरुन पडले होते. या कारणामुळं त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं, तेव्हापासून त्यांनी खाणंपिणं बंद केलं होतं. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. 30 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना प्रयागराज शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना घरी आणलं. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्रिपाठींनी 3 वेळा भूषवलं यूपी विधानसभेचं अध्यक्षपद
केशरीनाथ त्रिपाठी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1934 रोजी झाला. व्यवसायानं वकील असलेल्या केशरीनाथ त्रिपाठी यांची गणना भाजपच्या बलाढ्य नेत्यांमध्ये होते. ते तीन वेळा यूपी विधानसभेचे अध्यक्ष होते. यासोबतच यूपी भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षाला पुढं नेण्याचं काम केलं. या शिवाय, त्रिपाठी यांनी जुलै 2014 ते जुलै 2019 या कालावधीत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलंय.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….