औरंगाबाद हा भाजपचा गड नाही ; चंद्रकांत खैरे यांचा टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- भाजपने आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी कितीही सभा घेतल्या, तरी औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
तो तसाच ठेवू. त्यांनी सभा घेतल्या तरी त्याने काही फरक पडणार नाही. असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
औरंगाबाद येथे सोमवारी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची सभा आयोजित केली आहे. या सभेवर खैरे यांनी टोला मारला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची ज्या ठिकाणी सभा होणार आहे. त्याच्याच बाजूला चंद्रकांत खैरे हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त महादेवाचे दर्शन घ्यायला आले होते. त्यावेळेस त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
भुमरे माझ्यासमोर काहीच नाही
भुमरे कोण आहे…? मी त्याला काही समजत नाही. भुमरे माझ्यासमोर काहीच नाही, त्यामुळे भुमरेचा विषय माझ्यासमोर नको; अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.