भाजप राजा-महाराजांसह राजधानीवर चहुबाजूने हल्ला करतील ; असं का म्हणाले केजरीवाल…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या ‘राजा-महाराजां’सह राष्ट्रीय राजधानीवर हल्ला करेल. मात्र जनता त्यांना ‘चोख प्रत्युत्तर’ देईल, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी म्हटलं.
एमसीडी निवडणुकीपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रीय राजधानीत विविध रोड शोमध्ये भाग घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हल्लाबोल केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पक्षशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री एमसीडी निवडणुकीपूर्वी आज राष्ट्रीय राजधानीत होणाऱ्या १४ रोड शोजमध्ये सहभागी होणार आहेत.
‘आज भाजप दिल्लीवर हल्ला करणार आहे. त्यांचे अनेक राजे-महाराजे स्वत:च्या सैन्यासह दिल्लीवर चोहोबाजूंनी हल्ले करीत असतात. पण भाजप आणि उपराज्यपालांच्या हल्ल्यांना जशी दिल्लीतील जनता धैर्याने सामोरी गेली आहे, तशीच दिल्लीतील जनता आजही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल,’ असं केजरीवाल यांनी म्हटलं.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आसामचे त्यांचे समकक्ष हिमंत बिस्वा सरमा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हे या रोड शोमध्ये सहभागी होणार आहे.