“विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा, भारत जोडो यात्रा अखंड सुरू राहणार”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शेगाव :- राहुल गांधी यांनी स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
शेगाव याठिकाणी होणाऱ्या सभेला विरोध करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारत जोडो यात्रेला कोणी विरोध करत असेल तर ती त्यांची विचारधारा आहे. या देशाला एकसंघ ठेवणं ही काॅंग्रेसची विचारधारा आहे. एकता व एकात्मतेच्या आधारावर एकत्र करणं आवश्यक आहे. सर्वांना एकत्रित करणं त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. सामाजिक न्यायासाठी भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी सुरू केली आहे. विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा. आमची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर अखंड राहणार आहे. लोकं आमच्याशी जुळताहेत. असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, मनसेच्या नेत्यांची धरपकड गेल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. पोलीस यंत्रणा मनसे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड का करत आहे. ?असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे विधान करणारे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा थांबवून त्यांना अटक करा. कायम महाराष्ट्र व राज्याच्या अस्मिता, प्रतीक याबद्दल आकस असणाऱ्या काॅंग्रेसवाल्यांचा माज उतरवलाच पाहिजे. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.