‘मी मुस्लीम आहे, पांडुरंग माझं आधी ऐकेल’ ; अब्दुल सत्तारांचं देवाकडे ‘हे’ साकडं…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- पक्षाचे चिन्ह आणि नाव आम्हलाच मिळणार आहे, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की मी पांडुरंगाला साकडे घातले आहे.
मी मुसलमान आहे, त्यामुळे पांडुरंग मुसलमानांचं आधी ऐकेल. आमच्याकडे लोकप्रतिनिधी आणि त्यांना मिळालेले मतदान लीगल आहे. ठाकरे गटाचं सगळं अनाधिकृत आहे, कारण त्यांचे बॉण्ड फेक आहेत. म्हणून FIR दाखल झाला आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली
आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही अब्दुल सत्तार यांनी निशाणा साधला.
सत्तार म्हणाले, की आदित्य ठाकरे हे सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि कार्यक्रमासाठी नाही, तर फोटो काढण्यासाठी येत आहेत. मलासुद्धा उद्धव ठाकरे गटावर कीव (दया ) येते. शिंदे निवडून न येणे हे स्टेटमेंट करणं म्हणजे राजकारणात इतके पागल आणि बुद्धिभ्रष्ट लोक असू शकतात याचं उदाहरण असल्याचं सत्तार म्हणाले. मला पप्पू क्रमांक दोनवर दया येते, असं म्हणत सत्तारांनी आदित्य ठाकरेंवरही जहरी टीका केली.
‘पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो, कृषी मंत्री झालो. आगामी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या पक्का बोकांडी आहेत. पुढील 5 वर्षासाठी पंढरपूरला मी साकडं घालायला गेलो होतो. पांडुरंग पहिलं मुसलमानाचं ऐकेल.
सत्तार पांडुरंगाला जातो म्हणून त्याला गर्व आहे, मुसलमान ही पांडुरंगाला मानतो’, असंही अब्दुल सत्तार यावेळी बोलताना म्हणाले.
आदित्य ठाकरेंच्या सभेबाबत बोलताना सत्तार म्हणाले, की ‘मी एक माणुसकी जपणारा व्यक्ती आहे. माझ्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा मी सन्मान करेन. त्यामुळे म्हणतो त्यांना सिल्लोडमध्ये पाहिजे ती जागा मी द्यायला तयार आहे.
मात्र आता पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसणीबद्दल संवाद मला अजब वाटतो. पप्पू 2 आता शेतकरी नुकसानबद्दल शेतकरी संवाद करणार हे हास्यास्पद आहे. कारण आता पाऊस थांबला, नुकसान थांबलं आहे. सिल्लोडच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार नुकसान भरपाईसुद्धा देणार आहे. मग आता संवाद काय उपयोगाचा? असा सवाल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे