मंत्रिमंडळ विस्तार, 12 आमदारांवरुन पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल ; म्हणाले, सरकार राहील की नाही…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झालेला नाही. अजूनही अनेक जणांना मंत्रिपदाची आस लागलेली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार, विधानपरिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण – ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाबद्दल ते म्हणाली की, ही फक्त चालढकल सुरुयं. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. तसेच विधानपरिषदेच्या 12 आमदारांची निवड बाकी आहे.
बरेच जण 10 दिवसांसाठी मंत्री व्हायला तयार नाहीत. तसेच सरकार राहील का याचीच शक्यता नाही, या शब्दात त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. भारत जोडो यात्रेवर – दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केले. ते म्हणाले, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे नियोजन स्पष्ट करताहेत.
देगलूरला त्यांचे स्वागत होईल. पुण्याच्या संघटनात्मक तीन जिल्ह्यातून लोक बुलढाणा इथे सहभागी होतील. इतिहासांत एवढा मोठा राजकीय पदयात्रेचा कार्यक्रम झालेला नाही. तसेच भारत जोडो यात्रेचा रूट कसा ठरवला हे माहित नाही.
याबाबतचा निर्णय त्यांचा आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील पाच जिल्हे कव्हर होतील, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात राजकीय अनिश्चितता आहे का हे गुंतवणुकदार बारकाईने पहात असतात. सध्याचे सरकार मागचे निर्णय बदलत आहे.
जिथे शाश्वती नाही, तिथे गुंतवणूकदार थांबत नाही. तसेच केवळ खाजगीच नाही तर सरकारी गुंतवणूक ही मुंबईतून पळवली जाईल, तेव्हा फडणवीस चकार शब्दही बोलले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
फॉक्सकॉन हा प्रकल्पही तमिळनाडूला गेला.
ते आयफोन बनवणार होते. आता त्यांचा पहिला आयफोनही तयार झाला. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते, अशी आठवणही त्यांनी करुन दिली. उद्योगासाठी पुन्हा लायसन्स राज आणण्याचे प्रधानमंत्र्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा – राज्यात पोलीस भरती जाहीर केली होती. मात्र, ती परत रद्द केली. यामुळे सरकारची किती अप्रितष्ठा होते. उद्योग जाताहेत. मला त्यांच्या अंतर्गत भांडणात पडायचं नाही. ते आता जोरात सुरू झालेय. कुणी कुठेही जा, फिरा पण लोकांच्या कामांची जबाबदारी पार पाडा, असे आवाहन त्यांनी केले.