विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत विदर्भातील खासदारांनी आपल्या पक्षाची व आपली भूमिका स्पष्ट करावी :- माजी आमदार वामनराव चटप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- विदर्भ राज्य आंदोलन समिती ही विदर्भाला महाराष्ट्रातून वेगळे करून विदर्भ राज्य स्थापना करण्याकरिता सदोदित कार्यरत असून त्या दृष्टीने सतत आंदोलने धरणे मोर्चे उपोषणे करीत आलेली आहे विदर्भ राज्याची निर्मिती करण्याचा विषय भारताच्या घटनेतील अनुच्छेद क्र , 3 प्रमाणे राज्य निर्मितीचा अधिकार हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा असून आपण व आपल्या पक्षाने या संदर्भात काय प्रयत्न केले आहेत तसेच आपण आपल्या पक्षाची विदर्भ राज्याची निर्मिती बाबत काय भूमिका व धोरण आहे ते जाहीर पणे स्पष्ट करावे असे मत काल पुसद येथील विश्रामगृहावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी व्यक्त केले अनुशेष वाढीवर स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे देखील त्यांनी नमूद केले सध्या राज्याच्या तिजोरी ठणठणाट पैसे नसल्याचे मंत्र्यांचीच कबुली आहे विदर्भात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली असून याला सध्याची शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी या राज्याची धुरा हाती घेतली तरीही आर्थिक परिस्थितीत सुधारणार नाही त्यामुळे विदर्भातील जनतेने आपापल्या खासदारांना पोस्ट पत्र ई-मेल टाकून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती बाबत खासदाराची भूमिका स्पष्ट करण्याबाबत विनंती करावी अशा पद्धतीचे आंदोलनात विदर्भ राज्य समितीच्या माध्यमातून ” जवाब दो ” आंदोलन घेण्यात आले आहे याला विदर्भाच्या जनतेने प्रतिसाद द्यावा असा भावनिक आवाहन चटप साहेब यांनी केले आम्हाला स्वतंत्र विदर्भ देऊन छोटे राज्य केंद्रशासनाने निर्माण करून विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी केंद्र शासनाकडे विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी केली या आढावा बैठकीमध्ये शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी आता लोकव्यापी चळवळ उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाला केवळ उपेक्षा सोसावी लागली यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुपोषण , नक्षलवाद , गर्भार मातांचा , सिंचनाचा अनुशेष , वाढते प्रदूषण बालमृत्यू, विदर्भात 14 लाख बेरोजगार असल्याचे धक्कादायक आकडेवारी शासकीय आकडेवारीतून समोर आली असल्याचे नमूद केले विदर्भाला दारिद्र्याच्या घाईत लोटण्याचं काम केंद्र शासनाकडून होत असल्यामुळे केंद्र शासनाने तातडीने विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा अशी आग्रही मागणी मनीष यांनी केली या वेळेस अविनाश पोळकट , रंजनाताई मामर्डे , सुरेंद्र कोडगिडवार यांनी आपले विदर्भाबद्दल मनोगत व्यक्त केले या वेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रंजनाताई मामर्डे अध्यक्ष महिला आघाडी विदर्भ प्रदेश , कृष्णराव भोंगाडे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा , शेतकरी नेते मनीष जाधव विदर्भ राज्य आंदोलन समिती सदस्य , वसंतराव पाटील काणेकर लोकनायक बापू आणि समिती पुसद सुरेंद्र कोडगिडवार अध्यक्ष दक्षिण यवतमाळ विभाग , अविनाश पोळकट , संभाजीराव टेटर , नारायणराव शिरसागर , ज्ञानेश्वर तडसे , सुनील गुद्दटवार कोर कमिटी सदस्य विदर्भ राज्य आंदोलन समिती , धनंजय सोनी विदर्भ राज्य आंदोलन समिती सदस्य , रहेमान चव्हाण विदर्भ राज्य आंदोलन समिती युवक आघाडी तालुकाध्यक्ष आदी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष जाधव यांनी केले तर आभार अविनाश पोळकट यांनी मानले….