दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या गाड्यांचा अपघात ; 5 ठार 3 गंभीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरती अपघात झाला असून यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मध्यरात्री तीन वाजता हा अपघात झाला असून एकावर एक गाड्या आदळल्या.
त्यामुळे वरळीकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. तर अपघातातील ३ जण गंभीर जखमी असून मृत्यूची भिती व्यक्त केली जात आहे.
अपघात झाल्यानंतर जखमींना नेण्यासाठी आलेल्या रूग्णवाहिकेलाही दोन गाड्यांनी धडक दिली आहे. त्यामुळे या अपघातात एकून ५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून दसरा मेळाव्यासाठी आलेल्या गाड्यांना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
वरळी सी लिंकवर थांबण्यास मनाई असतानाही काही गाड्या या ५ ऑक्टोबर रोजी सी लिंकवर थांबल्या होत्या. त्यावेळी मागून वेगात आलेल्या वाहनाने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. हा संपूर्ण अपघात CCTV मध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर वायरल होत आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आले असताना पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहे. तर बंदी असताना वाहने घातल्याने हा अपघात झाला आहे.