पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- PFI सारख्या देश विघातक संघटना आहेत त्याचा चोख बंदोबस्त केला पाहिजे असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
ते म्हणाले की, पीएफआयवर बंदी घातली ती योग्य आहे, पाकिस्तानच्या घोषणा देणा-यावर कठोर करावाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केंद्र आणि राज्य सरकारचा गृहविभाग लक्ष ठेऊन आहे. देशात राष्ट्रद्रोही देशद्रोही विचार कोणाला पसरवू दिले जाणार नाही.
यावेळी भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनेला सामावून घेतले जाण्याचा विचार सुरू आहे याप्रश्नवर त्यांनी उत्तर मी नंतर नक्की उत्तर देईल असे सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात सर्वसामान्य लोकांचे सरकार स्थापन झाले असून सर्वाना घेऊन हे सरकार पुढे जाईल, सर्वाचा सर्वांगीण निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.