शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकारी यांची भेट ; एक लाखाची केली आर्थिक मदत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.२३ :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी मारेगाव तालुक्यातील पाच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच जिल्हा प्रशासन व शासन आपल्या सोबत
असल्याचे सांगत एक लाख रुपयांची आर्थिक मदत कुटुंबीयांना दिली.
जुलै-ऑगस्टमध्ये तालुक्यात अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतापिकांचे मोठे नुकसान झाले. पिके खरडून गेली. परिणामी, तालुक्यात एका पाठोपाठ एक १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तालुका प्रशासनाने एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबवीत गावागावात जागृती निर्माण केली.
गुरुवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुंडलिक रुयारकर (बोरी बु ) ,हरिदास सूर्यभान टोनपे ( शिवनी धोबे) ,तोताराम अंगद चिंचोलकर (दांडगाव), सुधीर गोलर (पांढरकवडा ), गजानन मुसळे (नरसाळा) या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासन- प्रशासन पाठीशी असल्याची ग्वाही देत एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे तहसीलदार दीपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी, सुनील निकाळजे यांच्यासह तालुका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
आठ दिवसांत देणार मदत
अतिवृष्टीमुळे शेतापिकांचे झालेल्या नुकसानीची मदतीचा ५३६ कोटींचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. मारेगाव तालुक्याचा निधी तहसीलदारांकडे पाठविला आहे. निधी वितरणाची कार्यवाही एक-दोन दिवसांत सुरु होईल. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे सांगितले.
यावेळी त्यांनी या पाच गावातिल शेतकरी , तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटिल, यांच्याशी चर्चा करुन गावातिल शेत्क-यांचे खाते अपडेट करणे, गावातिल शेतकरी आत्महत्या रोखण्यसाठी उपाययोजना करणे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याच्या जबाबदारीची जाणिव करुन दिली.