“बिनशर्त लिखित माफी मागा” ; स्मृती इराणीची काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा अवैध बार असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने आणखी एक आरोप केला होता.
त्या बारपासून दहा किमी अंतरावर गोव्यात स्मृती इराणींच्या नावे अलिशान घर असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. कोर्जुए गावात हे घर असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. स्मृती इराणी यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांना नोटीस पाठवल्या आहेत.
स्मृती इराणी यांनी पवन खेडा, जयराम रमेश, नेत्ता डिसूजा आणि काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसंच बिनशर्त लिखित माफी मागावी आणि तात्काळ प्रभावानं आरोप मागे घेण्यास त्यांनी सांगितलं आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या सर्व आरोपांचं खंडन केलं होतं.

काय म्हटलं होतं काँग्रेसनं?
काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणींची लेक झोईश इराणी ही मृत माणसाच्या नावावर लायसन्स घेऊन गोव्यात बार रेस्टॉरंट चालवित असल्याचा आरोप केला होता. तसेच यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. यामुळे इराणी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
यावर स्मृती इराणी यांनी प्रत्यूत्तर देताना सोनिया आणि राहुल गांधींच्या ५ हजार कोटींच्या लूटप्रकरणी तिच्या आईने पत्रकार परिषद घेतली, ही माझ्या मुलीची चूक आहे. मी राहुल गांधींना २०२४ मध्ये पुन्हा अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे आव्हान देते, मी वचन देते की ते पुन्हा पराभूत होतील. माझी १८ वर्षांची मुलगी प्रथम वर्षात महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे आणि कोणताही बार चालवत नाही, असे म्हणाल्या.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…