विरोधी पक्ष नेतेपदा साठी अजित पवार व जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा ; कोणाची वर्णी लागणार…..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
राज्यात आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये जसं मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतं तसंच विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं असतं. आता याच विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
अशातच विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रीवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. पाटील म्हणाले, शिवसेने खालोखाल राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. मात्र, सेनेतील ३९ आमदारांनी बंडखोरी करत वेगळा मार्ग स्वीकारला आहे. आता ते विरोधी बाकावर बसले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडील संख्याबळ पाहता आमचाच विरोधी पक्षनेता होईल असं पाटील म्हणाले.
याआधी देखील ‘राष्ट्रवादीकडे आकडे जास्त आहेत त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत बघायचं झालं तर विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे असू शकतं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. तसंच विरोधी पक्षनेते पदाबद्दल आमच्या नेत्यांची चर्चा झाली असेल, पण आकडे राष्ट्रवादीकडे जास्त आहेत. त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत बघायचं झालं तर विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीकडे असू शकतं असंही रोहित म्हणाले होते.
दरम्यान, आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित असून या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा होणार आहे.
तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळतं आहे. त्यामुळे आता विरोधकांकडील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विरोधी पक्ष नेते पदावर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…