उद्या जाहिर होणार जिल्हा परिषद गट आणि गन नियम डावलुन केलेल्या या गट आणि गनाचे प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता…..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- राज्य निवडणूक आयोगाने वाढीव गट, गण रचनेचा आदेश दिल्यामुळे महागाव तालुक्यात जुन्या ५ गटा ऐवजी आता एकुण आता ६ गट व १२ गणाची निर्मिती केली परंतु ही माहिती ६ महीण्यापुर्वीच समाज माध्यमातून उघडकीस आल्यामुळे गोपनीयता भंग कायद्यायन्वये दि, ३ जानेवारी २२ रोजी गुन्हा नोंद झालेला असतांनाही तिच माहिती प्रशासनाने दिले, २ जुन २२ रोजी प्रसिद्ध केली, यावर दि, ८ जुन २२ रोजी अॅड, डी, बी, नाईक माजी सभापती पं, स, महागाव यांनी दि, ४ ऑक्टोबर २०११ च्या रचना आदेशाचा सूक्ष्मपणे अभ्यास करून मुद्देसूद आक्षेप लेखी स्वरूपात दाखल केला,या सोबत कॉ, देवीदास मोहकर मा, जि, प, सदस्य,यांनीही आक्षेप दाखल केले, एकुणच प्रसिद्ध केलेल्या नियमबाह्य रचनेमुळे आयोगाचे कोणतेच आदेश न पाळल्यामुळे १) गोपनीयता, २) दिशा, ३) सलगता, ४) नैसर्गिक सीमारेषा, आणि ५) नैसर्गिक न्याय या पाच नियम तथा तत्वाचा कसा भंग होत आहे हे संदर्भासह जिल्हाधिकारी यांना भेटुन आपली बाजु प्रशासना समोर मांडली,
यावर दि, १६ जुन २२ रोजी आयुक्त कार्यालय अमरावती येथे सुनावणी झाली, तेव्हा आक्षेपातील केवळ एक मुद्दा मान्य करून पुसनदीची नैसर्गिक सीमारेषा पुल नसल्याने आम्ही दुरुस्ती केली आहे , आता पुस नदीच्या दक्षिणेकडील डोंगरगाव व मुडाणा गण जोडून मुडाणा गट निर्माण करित असल्याचे कच्चा नकाशा दाखविण्यात आला, आणि ईतर चार महत्त्वाचे मुद्दे सोईस्कर पणे बाजूला करून आक्षेप निकाली काढण्यात प्रशासकीय अधिकारी दिशाभूल करीत आहेत हे प्रशासनाच्या लक्षात आणुन दिल्यावरही दुसऱ्या दुरुस्ती बद्दल बोलू देत नव्हते , तरीही नाईकांनी सुनावणी मध्येच १२ गण व ६ गटाची अचुक अशी अपेक्षित रचना सादर केली, यामध्ये समाविष्ट गावे, लोकसंख्येच्या, दिशा, सलगता, नैसर्गिक सीमारेषा, आणि नैसर्गिक न्याय या नियमाचे पालन करण्यात आलेला अपेक्षित आराखडा दिला, परंतु एकच दुरुस्ती करून दि, २७ जुन २२ रोजी अंतिम प्रसिद्ध करणार हा अट्टाहास जिल्हा प्रशासनाने सुनावणीत बोलुन दाखविला,
प्रशासकीय स्तरावरील शेवटचा उपाय म्हणून दि, २० जुन २२ रोजी नाईकांनी, निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यवतमाळ व आयुक्त अमरावती यांना प्रत्यक्ष भेटुन कच्या दुरुस्ती मध्ये पुन्हा नैसर्गिक सीमारेषेचा कसा भंग होत आहे ते डोंगरगाव गणातील वाकोडी या गाळामुळे पटवुन दिले परंतु जिल्हा स्तरावर नकारात्मक भूमिका दिसताच त्याच तारखेत आयुक्तांना भेटुन निवेदन सादर केले, प्र, आयुक्त श्रीमती पवनीत कौर मात्र सकारात्मक द्रुष्टीकोण ठेवून शांतपणे ऐकून वाकोडी हे गाव पुसनदीच्या उत्तरेला असुन नदीच्या दक्षिणेकडील डोंगरगाव गणाला जोडल्यास पुन्हा नैसर्गिक सीमारेषा भंग होणार आहे,
हे लक्षात घेऊन तातडीने उपायुक्त शरद कुलकर्णी साहेब यांना वाकोडी गावावर हायलाइट करून आदेशीत केल्यामुळे अॅड, डी, बी, नाईक यांनी सादर केलेल्या अपेक्षित गट व गणात बरेच फेरबदल होवुन आता साई +काळी (दौ), तिवरंग + हिवरा, माळकिन्ही + गुंज करंजखेड +सवना, काळा (टें) + फुलसावंगी आणि डोंगरगाव+ मुडाणा प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे, जर प्रशासनाला तिन तिन वेळा लेखी आक्षेप देवुन,प्रत्यक्ष भेटुनही पुन्हा नियमबाह्य आणि मनमानी पद्धतीने रचना जाहीर केल्यास उच्च न्यायालय नागपुर खंडपीठात हे प्रभाग रचनेच प्रकरण जाणार असे कॉ, नाना पानपट्टे यांनी कळविले आहे.त्यामुळे उद्याच्या अंतिम आराखड्यावर संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे हे मात्र विशेष.