राहुल गांधीनी मांगितली चौकशी सत्रातून “सुट्टी” ; ईडीने केली लगेच मान्य… पण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली, 15 जून :- नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची मागील तीन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू होती
उद्या गुरुवारी सुट्टीची विनंती केली. ईडीने गुरुवारी चौकशी न करण्याची मागणी मान्य केली आहे. त्यांना पुन्हा एकदा शुक्रवारी बोलावले आहे. नॅशनल हेराल्डमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांची मागील तीन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे.
आज सुद्धा सकाळपासून राहुल गांधी यांची चौकशी झाली. त्यानंतर रात्री उशीरा 8.30 वाजेच्या सुमारास त्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सलग तीन दिवस चौकशीनंतर राहुल गांधी यांनी गुरुवारी एक दिवस चौकशीला येता येणार नाही, त्यासाठी मुभा द्यावी अशी विनंती ईडीकडे केली. राहुल गांधी यांची विनंती ईडीने मान्य केली आहे.
त्यामुळे गुरुवारी राहुल गांधी यांची चौकशी होणार नाही. मात्र, शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, आज सुद्धा राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेधार्थ ठिकठिकाणी काँग्रेसनं निदर्शनं केली. ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते.
राहुल गांधी यांच्या चौकशी प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? 1938 मध्ये काँग्रेसने असोसिएट जर्नल्स लिमिटेडची (AJL)स्थापना केली. असोसिएट जर्नल्स लिमिटेड अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आहे. AJL वर 90 कोटींहून अधिक कर्ज घेतले.
90 कोटी कर्ज फेडण्यासाठी यंग इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना केली. यंग इंडिया लिमिटेडमध्ये राहुल, सोनियांची हिस्सेदारी 38-38% टक्के आहे. एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले. शेअर्सच्या बदल्यात यंग इंडिया एजेएलचं कर्ज फेडणार आहे.
देशातील मोक्याच्या जागांवर कमी किमतीत ऑफिससाठी जागा आहे. मुंबई, दिल्ली शहरातील मोक्याच्या जागांचं भाडं AJLला मिळत होतं. या जागांचे मूल्य 2 हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली. 50 लाखांच्या मोबदल्यात यंग इंडिया कंपनी 2 हजार कोटींची मालक झाले.
याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधींविरोधात सुब्रह्मण्यम स्वामींचा खटला दाखल केला. गांधी कुटुंबाकडून नॅशनल हेराल्डच्या संपत्तीच्या गैरवापराचा आरोप केला गेला. मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबेस सॅम पित्रोदाही आरोपी आहे. 26 जून 2014 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडून समन्स जारी केला.
त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. 19 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पटियाला कोर्टाकडून सर्व आरोपींना जामीन मिळाला. फेब्रुवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने आरोपींविरोधातील कारवाई रद्द करण्याची याचिका फेटाळली. मे 2019 मध्ये, ईडीने 64 कोटींची मालमत्ता जप्त केली. 1 जून 2022 चौकशीसाठी ईडीने सोनिया, राहुल गांधींना समन्स बजावला. त्यानंतर आता राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे.