“बाळासाहेबांचे गुणाचे मुल्यमापन कुणीच करू नये” नारायण राणेचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 01 मे :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारून काढल्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
‘बाळासाहेबांचे गुणाचे मुल्यमापन कुणीच करू नये. भोळे वगैरे तर त्यांना कुणीच म्हणू नये. बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली मोठी केली. हे ना मुख्यमंत्रिपदाला शोभत, ना त्यांना ते जमत.
त्यांनी साहेबांवर बोलूच नये’ अशी टीका नारायण राणे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीतून भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नारायण राणे मैदानात उतरले.
बाळासाहेबांचे गुणाचे मुल्यमापन कुणीच करू नये. भोळे वगैरे तर त्यांना कुणीच म्हणू नये. बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली मोठी केली. मराठी माणूस आणि हिंदुत्व यावर त्यांनी राजकारण केलं.
त्यांनी मिळवलं जे काही लोकांना टिकवता येत नाही. त्यांनी बाळासाहेबांचे मुल्यमापन करू नये’ अशी टीका राणेंनी केली. ‘महाराष्ट्राच्या वर्धापन दिनी काही तरी राज्याला देता येईल का ते बोलावे. उगाच जे जमत नाही ते राजकारण करू नये.
ना मुख्यमंत्रिपदाला हे ना शोभत ना जमत. त्यांनी साहेबांवर बोलूच नये, असा टोला राणेंनी लगावला. ‘मुख्यमंत्र्यांनी सांगावे की राज्यात काय केले आहे. उत्तर प्रदेशने कायद्यानुसारच भोंगे उतरवले आहेत.
यांनी ही उतरवावे. नाचता येईना अंगण वाकडे. काही तरी कर्तृत्व आहे का ? अशी टीकाही राणेंनी केली.
‘बाबरी पडली तेंव्हा उद्धव ठाकरे कुठे होते. जेंव्हा शिवसेना अस्तित्वासाठी लढत होती तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते. महाराष्ट्रासाठी यांनी कधी कुणाच्या कानाखाली मारली, एक दिवस जेलमध्ये गेले का? उगाच आयत्या बिळात नागोबा आहे.
ते ही शरद पवार यांच्या जिवावर रहाव म्हणावे, अशी विखारी टीकाही राणेंनी कली. ‘असं घरात बसून राज्यात सरकार चालणार? मुलीच्या आत्महत्या, बलात्कार होत होत आहे. तुम्हाला कुणी विचारत नाही. तुमचा मुख्यमंत्री म्हणून काही फायदा नाही’ अशी टीकाही राणेंनी केली.