“मुंडे साहेबांच्या वारसांना हे जमलं नाही” :- धनंजय मुंडेच्या पंकजा मुंडेना अप्रत्यक्ष टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- आज पुण्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आले. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसरात हा उद्घाटन सोहळा पार पडला.
या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लावली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना टोला लगावला.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. ‘गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ सुरू होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला. त्यांच्या वारसदारांनाही संधी मिळाली, पण त्यांना हे महामंडळ निर्माण करता आले नाही’, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

‘अजित पवारांमुळे आजचा दिवस शक्य’
ते पुढे म्हणाले की, ‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महामंडळ देणे शक्य झाले नाही. कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी. आजचा कार्यक्रम हा मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे’, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
‘…काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय’
ते पुढे म्हणाले की, आज असंख्य ऊसतोड भगिनींचा प्रश्न आहे. चार दिवस कमी होतात म्हणून आमच्या भगिनींचे गर्भायश काढावे लागत असेल तर काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय. आमच्या भगिनींच्या आरोग्याची काळजीही हे महामंडळ घेईल. भगवान गड असेल किंवा बीड जिल्ह्यातील इतर गड असतील हे कोणत्याही मोठ्या माणसांच्या देणगीवर नाही तर ऊसतोड मजुरांच्या देणगीवर मोठे होतायेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….