अमिष शेलार मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळुन बोला ; अन्यथा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) गेल्या काही दिवसांपासून अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. आघाडी सरकामधील अंतर्गत वादामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचं समोर येत आहे.
अशातच विरोधक आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. यावर आता शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी संताप व्यक्त केला आहे.
आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक (shivsainik) तुम्हाला पळता भूई सोडणार नाही, असा इशारा मनिषा कायंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, आतापर्यंत कोरोना परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात राहिला आहे, असंही कायंदे म्हणाल्या.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…