शहीद दिनानिमित्त विद्यार्थी युवकांचे शिबीर व पुस्तक प्रकाशन सोहळा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- दि 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने विद्यार्थी व युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गिताई सेवा केंद्र ,पुसद येथे करण्यात आले होते.तसेच या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र किसान सभा द्वारा प्रकाशित कॉ. निरंजन गोंधळेकर लिखित “शेतकऱ्यांसाठी एम एस पी का महत्वाची?” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी आज किसान सभेचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. नामदेवराव गावडे यांचं निधन झालं म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. अमोल गावरशेट्टीवार व उद्घाटक म्हणुन किसान सभेचे कॉ. सुरेंद्र गडदे हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकप चे राज्य सचिव कॉ तुकाराम भस्मे व किसान सभेचे नेते कॉ अरुण बनकर तसेच मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे राज्यउपाध्यक्ष प्रशांत खंदारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक संघटनेचे जिल्हासचिव निखिल टोपलेवार यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संघटनेचे पुसद तालुकाध्यक्ष समाधान बळी यांनी केले.
“भगतसिंगांचे विचार व देशातील आजची परिस्थिती व आपली जबाबदारी” या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. भगतसिंगांना अभिप्रेत असलेला भारत घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांनी भगतसिंग यांच्या विचारांचे आचरण करावे. नवीन शिक्षण प्रणाली देशातील गरीब , कष्टकरी वर्गाच्या मुळावर असून शिक्षणाचे खाजगीकरण त्वरित रोखले पाहिजे. असे मत कॉ. तुकाराम भस्मे यांनी व्यक्त केले. तर भगतसिंग , सुखदेव, राजगुरू यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवदान दिले. भागतसिंगांच्या बाबतीत अनेक अफवा पसरवून खोटा इतिहास जनतेच्या समोर आणण्याचा घाट काही मंडळी कडून करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी व युवकांनी भगतसिंगांचे साहित्य वाचावे. ‘इतनी वाकीफ है मेरी कलम मेरे जजबातो से , मै अगर ईश्क लिखना चाहु तो इन्कलाब लिखती है’ हे भगतसिंगांचे वाक्य समजावून सांगताना प्रशांत खंदारे यांनी सांगितले की, भगतसिंग यांचं प्रेम या देशाच्या स्वातंत्र्यावर होते. तसेच भगतसिंग यांच्या शहीद दिनाचा व्हॅलेन्टाईन डे च्या दिवसाशी काही संबंध नसुन युवकांनी अशा प्रकारचा खोटा इतिहास पसरविणाऱ्याचा डाव हाणून पाडला पाहिजे असेही ते म्हणाले. तसेच कॉ अरुण बनकर यांनी भगतसिंगांची विचारधारा यावर थोडक्यात माहिती सांगितली.
यावेळी पुसद, माहूर, दिग्रस, उमरखेड तालुक्यातील अनेक विद्यार्थी व युवकांनी सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तकांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एआयवायएफ जिल्हासचिव निखिल टोपलेवार, एआयवायएफ तालुकाध्यक्ष समाधान बळी, आकाश राठोड, कॉ, सुरेंद्र गडदे, कॉ साहेबराव राऊत, विष्णु सरकटे , प्रमोद धुळे, सिपीआय तालुकासचिव अमोल गवरशेट्टीवार , गिताई सेवा केंद्राचे ट्रस्टी बसवराज डोंगरे, राजू गायकवाड, प्रशांत खंदारे ,डॉ खुर्शीद वजुद, आकाश राठोड यांनी अथक परिश्रम घेतले.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….