चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागील अडचणी काही केल्या संपताना दिसत नाही.कारण देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाने आता त्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे.
चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सचिन वाझेच्या बद्दल क्रॉस एक्झामिनेशनसाठी वकिलाच्या अनुपस्थितीमुळे हा दंड ठोठवला गेला आहे. हा दंड मुख्यमंत्री मदत निधीत जमा केला जाणार आहे.
या अगोदर सप्टेंबर महिन्यात वसुलीचा आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
परमबीर सिंग हे आयोगासमोर उपस्थित राहत नाही त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागत आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे असे आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी म्हटले होते. यावर आयोगाने परमबीर सिंग यांना ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये या आयोगाची स्थापना केलेली आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….