कृषीदूतांनी दिली गांडुळखत निर्मिती केंद्राला भेट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ७२४९-४४४-८८८
उमरखेड :
येथील कृषिभुषण बाबारावजी जाधव यांच्या सेंद्रीय शेती व गांडुळखत निर्मिती केंद्राला नुकतीच उमरखेड कृषि महाविद्यालय अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या कृषिदूतांनी भेट दिली व गांडुळखताचा एक बेड भरण्यास मदत केली.
उमरखेड (जि.यवतमाळ) येथील कृषिभुषण बाबाराव जाधव यांनी खुप वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. त्यासाठी सुरू केलेल्या गांडूळ खत उत्पादन प्रकल्पाची वाटचाल व्यावसायिक उत्पादनापर्यंत पोचली आहे. एक बेडपासून सुरू झालेला प्रवास आज पाच बेड पर्यंत पोहचला आहे,सेंद्रिय शेतीसाठी त्यांना,भारत सरकारचा उत्कृष्ट शेतकरी ,महाराष्ट्र सरकारचा कृषिभूषण ,जिल्हास्तरीय असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. कृषीदुत शीलवान वाढवे, शेख सोहेल, संकेत वानखेडे, आशीष कदम, धीरज मस्के यांनी गांडुळखत निर्मिती तसेच सेंद्रिय शेती अश्या अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली .
यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के.चिंतले व ग्रामीण कृषी कार्यानुभव अधिकारी आर.के.सपकाळ,व तसेच विषयतज्ञ (मृदाशास्त्र) प्राध्यापिका सोळंके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….