भांब येथील तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू ; महागाव तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव
शेतात काम करण्यासाठी निघालेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना महागाव तालुक्यातील भांब येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली आहे.रोहन तुळशीराम भालेराव (१९) असे मृतक तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
नेहमीप्रमाणे रोहन हा शेताकडे निघाला होता.
काही वेळाने रोहण हा भांब गावालगत असलेल्या सिमेंट बंधाऱ्यात बुडत असल्याचे लहान मुलांच्या निदर्शनात आले.त्यांनी गावाकडे धाव घेत रोहनला वाचविण्यासाठी आर्त हाक दिली.गावातील काही धाडसी तरुणांनी बंधाऱ्याच्या पाण्यात उडी घेवून रोहनचा शोध घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने त्याच्या शोध कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या.परंतु अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास
पाण्यातील खोल भागात एका आडव्या पडुन असलेल्या झाडात अडकलेला रोहनचा मृतदेह आढळून आला.
रोहन हा तुळशीराम यादव भालेराव यांना एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशी माहिती ॲड. डि.बी. नाईक यांनी दिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..