‘आमच्या बैठकीबाबत त्यांना काय माहिती’, राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर शरद पवार यांचा नवा बॉम्ब….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरूच झाली नव्हती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा गटातील नेत्यांनी केला.
त्यांच्या या आरोपांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले. जे आमच्या बैठकीत चर्चेलाच नव्हते, त्यांना आमच्यात काय चर्चा झाली, याची कशी माहिती असेल? असा सवाल पवार यांनी केला. एकप्रकारे शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि दादा गटातील नेत्यांचे दावे खोडून काढले.
शरद पवार यांनी मुंबईत सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेत राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर आतापर्यंत काय काय चर्चा झाली होती, त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली होती का? असे प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विलीनीकरणावरील दावाही पवार यांच्यासमोर ठेवला. तेव्हा त्यांनी दादा गटातील नेत्यांना आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही बोचरा वार केला.
‘आमच्या बैठकीबाबत त्यांना काय माहिती’
विलीनीकरणाच्या चर्चा सुरूच नव्हत्या असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दावा करण्यात आला होता. त्यांच्या याच दाव्याला शरद पवार यांनी जोरदार उत्तर दिले. विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना आमच्याच बैठकीबाबत काय माहिती असणार? असे शरद पवार म्हणाले. याउलट राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत आमच्यात चर्चा झाली होती. आमच्या बैठकाही झाल्या होत्या. १२ फेब्रुवारीला आम्ही त्यासंदर्भात घोषणा करणार होतो, असे शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले.
देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विलीनकरणाची चर्चा फेटाळून लावताना अजित पवारांनी आपल्याशी अशी कोणतीही चर्चा केली नव्हती असा दावा केला. अजित पवार माझे खूप चांगले मित्र होते. प्रत्येक गोष्ट ते आम्हाला सांगायचे. एवढी मोठी गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली नसती का? असा सवाल उपस्थित करीत पुढेही असा काही निर्णय होणार असेल तर त्यांनी भाजपशी सल्लामसलत करावी, असे फडणवीस म्हणाले…!

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..