उद्धव ठाकरेंचा एक आमदार कमी होणार? जात प्रमाणपत्र खोटं असल्याची याचिका दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना ठाकरे गटाला विधासभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत 21 जागा लढवत ठाकरेंनी 9 खासदार निवडून आणले होते. त्यामुळे विधानसभेला देखील त्यांना चांगला फायदा होईल, असं बोललं जात होतं.
मात्र ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही. 87 जागा लढवत ठाकरेंचे केवळ 20 आमदार निवडून आले आहेत. पण आता एका आमदाराची आमदारकी धोक्यात आली आहे.
ठाकरे गटाचे उमरगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी स्वामी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुरुवातीला ज्ञानराज चौगुले यांनी प्रवीण स्वामी यांच जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत जात पडताळणी समिती धाराशिव यांच्याकडं रीतसर तक्रार दाखल केली होती.
परंतु समितीने याबाबत सुनावणी घेण्याचे अधिकार समितीस नसल्याचे कारण देत चौगुले यांची तक्रार फेटाळली होती. त्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या याचिकेसह निवडणूक लढविण्याच्या अनेक तांत्रिक आधारावरही ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
चौगुले यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने जात पडताळणी समिती धाराशिव आणि आमदार प्रवीण स्वामी यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्हीं प्रकरणात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने ॲड. एस. एस. गंगाखेडकर हे काम पाहत आहेत. अशाप्रकारे चौगुले यांनी प्रवीण स्वामी यांच्याविरोधात याचिका दाखल केल्याने, स्वामी यांच्यांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. त्यांच्या जवळील जात प्रमाणपत्र बनावट निघालं तर ठाकरे गटाचा एक आमदार कमी होऊ शकतो. त्यांच्या अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. असं झालं तर हा थेट उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का असेल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….