मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल मुख्य सूत्रधार ; ईडी कडून युक्तिवाद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर त्यांना आज शुक्रवारी (दि.२२) राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने सुनावनीदरम्यान केली. (Arvind Kejriwal arrest news) अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एसव्ही राजू यांनी आज न्यायालयात ईडीची बाजू मांडली. अरविंद केजरीवाल हेच दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. आज शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांच्या १० दिवसांची कोठडीची मागणी ईडीकडून करण्यात आली. गुरुवारी रात्री ९.०५ वाजता केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यांच्या १० दिवसांच्या कोठडीसाठी अर्ज दिला आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एसव्ही राजू न्यायालयासमोर सांगितले. यावेळी राजू यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सेंथिल बालाजी प्रकरणाच्या निकालाची प्रत न्यायालयाला दिली. त्यांनी निकालातील संबंधित परिच्छेद वाचून दाखवले.
केजरीवाल मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा दावा
अरविंद केजरीवाल हेच दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांचा थेट सहभाग असल्याचा युक्तिवाद राजू यांनी केला. विजय नायर केजरीवाल यांच्या घराशेजारील घरात राहत होते. ते आम आदमी पक्षाचा मीडिया प्रभारी होते. त्यांनी (विजय नायर) आम आदमी पक्ष आणि दक्षिण गट यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजू यांनी म्हटले.
दक्षिण ग्रुपला फायदा करून देण्याच्या बदल्यात केजरीवाल यांनी त्यांच्याकडून मोबदल्याची मागणी केली. त्यांना फायदा करून देण्याच्या बदल्यात केजरीवाल यांनी दक्षिण ग्रुपकडून मोबदल्याची मागणी केली. यातून सुमारे दक्षिण ग्रुपकडून मिळालेले ४५ कोटी आम आदमी पक्षाने गोव्यातील २०२१-२२ मधील प्रचारासाठी वापरले. चेन्नईहून आलेला पैसा व्हाया दिल्ली गोव्यात गेला. हा व्यवहार केवळ १०० कोटी रुपये नाही. 45 कोटी रुपयांचा हवाला ट्रेल्स सापडला, पैसे गोवा निवडणुकीत वापरले गेले, असा दावा एसव्ही राजू यांनी युक्तिवादादरम्यान केला. गोव्यातून मिळालेले पैसे चार मार्गांनी आल्याचे एका निवेदनातून समोर आल्याचेही त्यांनी निर्दशनासून आणून दिले.
दरम्यान, यावेळी अभिषेक मनू सिंघवी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडत आहेत.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणाच्या तपासाचे मुख्य लक्ष मध्यस्थ, व्यापारी आणि राजकारणी यांच्या कथित नेटवर्कवर होते ज्याला तपास यंत्रणांनी ‘दक्षिण ग्रुप’ म्हटले आहे. ईडीचा आरोप आहे की ‘दक्षिण ग्रुप’च्या कंपन्यांना मदत करण्यासाठी मद्य धोरणात बदल करण्यात आला होता आणि सिसोदिया यांनी कोणताही सल्ला न घेता त्यांच्या हिताच्या दृष्टीने सौम्य भूमिका घेतली.
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या अन्य नेत्यांना यापूर्वीच अटक केली आहे. ‘ईडी’ने आतापर्यंत केजरीवाल यांना चौकशीसाठी ९ वेळा समन्स बजावले होते. त्यांनी ‘ईडी’च्या नोटिसा आणि अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर ‘ईडी’चे पथक रात्री दहावी नोटीस आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. अटकेपूर्वी केजरीवाल यांची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

गव्हर्मेंट जॉबमधील मराठी कर्मचाऱ्यांना हिंदीच्या परीक्षेची सक्ती..? राज्य सरकारच्या पत्रकाने खळबळ….
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका….
दहावीचा निकाल या दिवशी लागणार ; संभाव्य तारीख आली समोर….
शिक्षकांच्या 8 ते 13 हजार जागा भरणार, शिक्षणसेवकांच्या आशा पल्लवित….
काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….