राज्यात उद्योजक-कारखानदार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील दहा महापालिका क्षेत्र वगळून कोरोना प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले तरीही उद्योग, कारखाने सुरू करण्यासाठी असलेल्या अटींमुळे उद्योजक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. औरंगाबाद, नाशिकसह विविध जिल्ह्यांमध्ये कृषिपूरक, औषधनिर्मिती, आयटी, वीटभट्ट्या अादी उद्योग सुरू करण्याविषयक परवानगी देण्यात अाली आहे. मात्र, कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळणे, कामगारांची कारखान्याच्या आवारातच जेवणाची व निवासाची व्यवस्था आदी अटींमुळे संभ्रमाचे वातावरण अाहे.
औरंगाबाद शहराबाहेरील वाळूज, शेंद्रा येथील कारखाने सुरू करण्याची मुभा असली तरीही कामगारांविषयक अटींमुळे कारखाने सुरू करण्यास अडचण असल्याचे उद्योजकांनी सरकारला कळवले आहे. तीच परिस्थिती नाशिकमध्येही असून नाशिक शहरातील सातपूर, अंबडमधील केवळ अत्यावश्यक सेवेशी निगडित अाणि ग्रामीण भागातील केवळ दहा टक्के कारखानेच सुरू हाेऊ शकतील असे चित्र अाहे. सोलापुरात वस्त्रोद्योग आणि विडी उद्योगसंबंधित कारखाने शहराच्या हद्दीतच असल्याने हे कारखाने सुरू होऊ शकणार नाहीत, असे उद्योजकांनी स्पष्ट केले आहे. रविवारी मंत्रालय ते एमअायडीसीचे प्रादेशिक कार्यालये यांमध्ये व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगद्वारे माहितीची देवाण-घेवाण सुरू हाेती. यानुसार अाता उद्याेग सुरू करायचे असल्यास २० एप्रिलपासून एमअायडीसीच्या संकेतस्थळावर एक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार अाहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..