१०वी च्या परीक्षेसाठी निघालेल्या तीन विद्यार्थिनींना भरधाव, कारने उडवले
- यात एका विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू तर अन्य दोघी गंभीर जखमी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
गोंदिया: दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने उडवले. यात एका विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. बालाघाट मार्गावरील सावरी गावाजवळ आज हा अपघात झाला.
दहावीची आजपासून परीक्षा सुरू झाली आहे. तीन विद्यार्थिनी परीक्षेसाठी केंद्रावर जात होत्या. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाघाट मार्गावरील सावरी गावाजवळ सकाळी दहाच्या सुमारास एका भरधाव कारनं या तीन विद्यार्थिनींना उडवले. यात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघी जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. तसंच संतप्त जमावानं काही वेळ रास्ता रोको केला. कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….