एक रस्ता असाही तिथे 40 लोक रात्री…; आदित्य ठाकरेंची टोलेबाजी, शिंदे गट भडकला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- रस्त्यांवरील खड्डे आणि समृद्धी महामार्गावरील अडचणींच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपल्याचं यला मिळालं. यात खड्ड्यांच्या मुद्द्यावरून विरोधकारांनी सरकारला खडेबोल सुनावली आहेत.
तर सत्ताधाऱ्यांनी खड्ड्यांच्या मुद्दा गेल्या दोन वर्षांपासूनचा असल्याचे म्हणत मविआ सरकारलाच जबाबदार धरले आहे. या मुदद्याला धरून आज माजी मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी गुवाहटीचा उल्लेख करत शिंदे सरकारवर टोलेबाजी केली आहे. आदित्य ठाकरेंनी सूरत व्हाया गुवाहाटीचा उल्लेख करत शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना डिवचले. एक रस्ता असा आहे तिथे 40 लोकं रात्रीपण पळून जायचे दिवसापण पळून जायचे, तसा रस्ता बनला तर पळता येत धावता येत तिथून गुवाहाटीला पण जाता येतं असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर शिंदे गटातील मंत्री आणि आमदार देखील प्रचंड संतापल्याचे यला मिळाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्ही काळजीवाहू आहेत घाबरू नका. एक गोष्ट अशी आहे की, मागच्या दोन तीन महिन्यामध्ये एक रस्ता असा आहे तिथे 40 लोकं रात्रीपण पळून जायचे दिवसापण पळून जायचे, त्या रस्त्याचा दर्जा शिंदे फडणवीस सरकारने चेक करावा, तसा रस्ता बनला तर पळता येत धावता येत तिथून गुवाहाटीला पण जाता येतं असा टोला त्यांनी लगावला.
यावर मंत्री शंभूराज देसाईंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंनी सुरतच्या रस्त्याची अधिकचं धास्ती घेतली आहे, जे काही थोडेसे शिल्लक सेनेत आहेत त्यांना त्या रस्त्याचा वापर करावा लागू नये, याची काळजी पुढे त्यांनी घ्यावी, असा पलटवार शंभूराज देसाईंनी केला आहे.
आता तुमचा विषय संपला, गुलाबराव पाटलांचा पलटवार
विरोधी पक्षानेत्यांनी विचारलेला प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. सुरतचा प्रश्न, गुवाहाटीचा प्रश्न, यावर यांना जर चर्चा करायची आहे ना असेल, तर यांना दाखवतो मात्रोश्रीचे रस्ते कसे होते, कसे झाले. तुम्ही सुरत कसे गेले, गुवाहाटी कसे गेले, हे बोलण्याची गरज नाही. गेले, आता तुमचा विषय संपला,” अशा संतप्त प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला दिले आहे.