तर राज्यातील परिस्थिती आणखी गंभीर होईल, अजित पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी आज सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्ताबदलानंतर प्रशासन पूर्ण ठप्पा झालं आहे.
जनतेची काम रखडली आहेत. प्रशासनावर सरकारचा वचक उरला नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मंत्री, सत्ताधारी नेते चूकत असल्यास मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालंव अन्यथा राज्यातील चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे, भाजप सरकारमध्ये प्रशासन ठप्प आहे. सत्ताबदलानंतर प्रशासन पूर्ण ठप्प झाले. जनतेची काम रखडली आहेत.
प्रशासनावर सरकारचा वचक उरलेला नाही. राज्यातील पोलीस तणावात आहेत. थेट वरून आदेश येतात. सचिव व इतर अधिकारीही तणावात आहेत.
अनेक बैठका वेळेवर रद्द होतात. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाडांवरून निशाणा जितेंद्र आव्हाड यांंना मॉलमधील मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना एक रात्र पोलीस कोठडीत काढावी लागली.
त्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावरून देखील अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला. पोलिसांवर दबाव आहे. पोलिसांना थेट वरून फोन येतात.
जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतही वरूनच दबाव होता असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. नाराजीवर पवारांची प्रतिक्रिया मी नाराज नाही. मी नाराज असल्याच्या बातम्या जाणाीवपूर्वक दाखवण्यात आल्याचं पुन्हा एकदा अजित पवार यांनी म्हटलं आहे. शिर्डीमधील अधिवेशनानंतर आपण काही कामानिमित्त परदेशात होतो असं त्यांनी म्हटलं आहे.