राज्यात भाजपाकडे आता धन, दांडा दोन्ही..! ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींचे तसेच कार्यकर्त्यांचे अधिकारी वर्गाकडून म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते. त्यांना कायम डावलले गेले.
मात्र आता आमचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीसांकडे गृहखाते आणि अर्थखाते देखील आहे. यामुळे आपल्याकडे सध्या धनही आहे आणि दांडाही आहे. यामुळे अधिकारी वर्गाने भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांचे तसेच लोकप्रतिनिधींची नियमात बसणारी कामे विनाकारण थांबवू नये. असे केल्यास आम्ही सोडणार नाही. असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील अधिकारी वर्गाला दिला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. ठाण्यात देखील ही निवडणूक पार पडले. त्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्यांने दिवसातले दोन तास काढून त्यांच्या विभागातील चार घरांना भेटी द्यायच्या आहेत. तसेच येत्या निवडणुकीत ते भाजपलाच मदत करतील या प्रकारे त्यांचे मत परिवर्तन करायचे आहे. हे अभियान पुढील दोन महिन्यांसाठी राबवयाचे आहे. असा कार्यक्रम त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांने संपूर्ण ताकदीने हा उपक्रम राबविल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यात भाजपा आणि बाळासाहबांच्या शिवसेनेचा खासदार असेल. तसेच येत्या ठाणे महापालिका निवडणुकीत महापौर देखील असाच असेल. यासाठी मेहनत घ्यावी. असे आवाहान बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
‘उद्धव ठाकरेंचे मतांसाठी लांगूलचालन’
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे सध्या एकत्र असल्यासाचे समजत आहे. मतांसाठी सध्या उद्धव ठाकरे हे कोणाचेही लांगूलचालन करत आहेत, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.