मोठी बातमी ; राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्यात कोरोनाची लाट जवळपास संपली आहे. सर्व विद्यापीठातील परीक्षा (exam) ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे सोमवारी त्यांनी ऑनलाइन बैठकीत सर्व विद्यापीठांशी संवाद साधला. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे समजते.
राज्यात आतापर्यंत कोरोनाची लाट होती. मात्र, दीड महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महाविद्यालये ऑफलाइन सुरू असताना विद्यापीठांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.
याबाबत विद्यार्थी संघटनाही आक्रमक असल्याचे दिसून आले. त्यातून काही विद्यापीठाद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले. मात्र, सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा (exam) आढावा घेतला. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही माहिती देण्यासाठी ते पत्रकार परिषदही घेणार असल्याचे समजते.

नागपूर विद्यापीठाने दोन दिवसांपूर्वी ऑनलाइन परीक्षा (exam) घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेतला होता. आता ऑफलाइन (offline) परीक्षा होणार असल्याने विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यात संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या विरोधात
कोरोनाची लाट जवळपास संपल्याने सर्व महाविद्यालये आणि शाळा पूर्ण क्षमतेने पूर्ण वेळ सुरू झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षासुद्धा ऑफलाइन घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. यापूर्वीही परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत उदय सामंत यांनी सूचक विधान केले होते. त्यानुसार त्यांनी कुलगुरूंसोबत घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत निर्णय घेतला. परंतु, विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या विरोधात आहेत. त्यासाठी काही ठिकाणी आंदोलनेसुद्धा झाली आहेत. उदय सामंत यांच्या आजच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…