आमदार आराधना मिश्रा सांभाळणार काँग्रेस विधिमंडळाची कमान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर खास मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार आराधना मिश्रा (Aradhana Mishra) उर्फ मोना या पुन्हा एकदा काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असणार आहेत.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी आराधना यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी त्यांची उत्तर प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती दिली. आराधना या गेल्या विधानसभेत काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेत्या राहिल्या आहेत.
2017 मध्ये भारतीय जनता पक्षानं (BJP) पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केल्यानंतर, अजय कुमार लल्लू यांना कॉंग्रेस (Congress Party) विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यात आलं होतं. परंतु, नंतर त्यांची प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही जबाबदारी आराधना यांच्याकडं सोपविण्यात आली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी काँग्रेसनं फक्त सात जागा जिंकल्या होत्या. यावेळी अजय कुमार लल्लू यांचा कुशीनगर जिल्ह्यातील तमकुहिराज येथून भाजपच्या डॉ. असीम कुमार यांच्याकडून पराभव झाला. नंतर त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.
यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या, त्यात प्रतापगडच्या रामपूर खास जागेवरून आराधना पुन्हा निवडून आल्या आहेत, तर महाराजगंज जिल्ह्यातील फरेंदा मतदारसंघातून विजयी झालेले वीरेंद्र चौधरी हे काँग्रेसचे दुसरे आमदार आहेत. चौधरी यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकलीय, तर आराधना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आराधना यांचे वडील प्रमोद तिवारी हे देखील दीर्घकाळ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…