राज्यात गुरुवारी 6248 रुग्णांची नोंद तर 18,942 कोरोनामुक्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 6 हजार 248 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज 894 रुग्णांची वाढ झाली असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 18 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 121 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 121 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3455 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2291 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,164 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज 45 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 12 हजार 233 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.22 टक्के आहे. सध्या राज्यात 5 लाख 53 हजार 175 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2386 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 60 लाख 40 हजार 567 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 429 नवे कोरोना रुग्ण
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 429 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 822 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 3 हजार 698 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 949 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये तब्बल 109 दिवसांची वाढ झाली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….