12 जिल्ह्यात गारपीट ; अवकाळी पावसाचा फटका ; वीज कोसळून विदर्भात तिघे ठार ; पिके व भाजीपाल्याचे नुकसान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर/औरंगाबाद/अकोला : मंगळवारी विदर्भातील अकाेला, वाशिम, बुलडाणा, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व तसेच अहमदनगर जिल्ह्यांना अवकाळी व गारपिटीचा मोठा तडाखा बसला.
विदर्भात वीज कोसळून तिघे ठार झाले.
काही ठिकाणी बोराच्या वा हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. एके ठिकाणी वीज पडून २५ बकऱ्यांचा मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात एका शेतकरी तर भंडारा जिल्ह्यात एक बालक वीज काेसळून मरण पावले. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे बुधवारी पावसाची शक्यता असल्याचे, हवामान शास्त्र विभागाने कळविले आहे.
पिकांचे नुकसान
अवकाळी व गारपिटीमुळे तुरीसह रब्बीतील हरभऱ्यासह अन्य पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. भाजीपाला व फळपिकांचेही नुकसान झाले. अनेक भागात साेंगून ठेवलेले साेयाबीन भिजले तर मका, गहू, कांदा पिकाचेही नुकसान झाले.
मराठवाड्यातही तडाखा
– औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर तसेच वैजापूर तालुक्यातील काही भागांत गारपिटीचा तडाखा बसला, तर सिल्लोड व कन्नड तालुक्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.
– जालनाच्या भोकरदन तालुक्यातील
विविध ठिकाणी मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. वालसावंगी येथे वीज पडून एक बैल ठार झाला.
– अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात गारपिटीसह अवकाळीने गोदाकाठच्या कांदा
व हरभरा पिकांचे नुकसान झाले. दाट धुक्यामुळे नागपूर विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..