महायुती सरकारमध्ये सत्ताधारीच सुरक्षित नाहीत, भाजपच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील काही महिन्यांपासून राज्यात प्रतिनिधींना धमकी देणाऱ्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहेत. यातच आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आपल्याच मित्रपक्षाकडून धमकी, शिवीगाळ दिली जात असल्याची घटना समोर आली आहे.
यासंदर्भात स्वत : हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे राज्यात सत्ताधारीच नेते सुरक्षित नाही मग इतरांचे काय ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापुर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व संभामधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत असल्याचा उल्लेख हर्षवर्धन पाटलांनी पत्रात केलं आहे.
यातच तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण याबाबत ठोस भुमिका घेऊन योग्य ती कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे…