ठाकरे गटाला पडणार खिंडार…? शिंदे शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात एकीकडे अजित पवार यांचा सत्तेत सहभाग झाल्यामुळे खातेवाटपाची जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटातील आणखी 4 आमदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी उदय सामंत यांनी सांगितलं होतं की ठाकरे गटातील सहा आमदार शिवसेना शिंदे गट येणार त्यापैकी आता 2 आमदार शिवसेना शिंदे गटात आले आहे. आता आणखी चार आमदार आमच्या संपर्कात आहे, ते चारही जण वेळेवर येतील, असा दावाच उदय सामंत यांनी केला आहे. ‘शिवसेनेचे कोणतेही आमदार ठाकरे गटाकडे जाणार नाही.
ठाकरे गटाला सहानभूती मिळावी आणि स्वतःच्या गटातील लोक स्वतःच्या ताब्यात राहावे यासाठी शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहे असं बोललं जात आहे. अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
तसंच, आजही सांगतो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. लवकरच हा विस्तार होईल आणि सर्वांना विश्वासात घेऊन केला जाणार आहे, मी सध्या अमरावतीत आहे, मुंबईत काय घडतंय याबद्दल मला कल्पना नाही, असंही सामंत म्हणाले.
बच्चू कडू हे काही नाराज नाही, त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. आमच्यात जे 40 आमदार आहे, त्यांना सुद्धा न्याय मिळाला नाही. बच्चू कडू यांनी आपली भावना व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्य न्याय देतील आणि योग्य निर्णय घेतील, असंही सामंत म्हणाले.