नामांतराचं लोण आता पुण्यात…! जिजाऊनगर करा म्हणून शहरभर लागले होर्डींग्ज ; कोणी केली मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचंही नाव बदलण्यात आलं आहे. शहराचं नामांतर करण्याचं लोन आता पिंपरी चिंचवडमध्ये येऊन पोहोचलं आहे.
पिंपरी चिंचवडचं नाव बदलून जिजाऊनगर केलं जावं अशी मागणी करत एका तरुणाने शहरभर पोस्टरबाजी केली आहे. तर शहराचं नावं बदलण्यापेक्षा नवा जिल्हाच स्थापन करायला हवा या मागणीवर भाजपचे आमदार ठाम आहेत. शहरभर लागले होर्डींग्ज पुण्याचे नावं बदलून जिजाऊनगर करा, अशी काँग्रेसची मागणी तर पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी नावाचा जिल्हा स्थापन करा अशी भाजप आमदारांची मागणी आहे. या वादग्रस्त मागण्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊ नगर करा अशी मागणी पुढे आली आहे.
ही मागणी केलीय मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच पुतणे महेश बारणे यांनी. केवळ तोंडी मागणी न करता महेश बारणे यांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शहरभर होर्डिंज लावले आहेत. भाजपची जिल्हा विभाजनाची मागणी खरंतर महेश बारणे यांनी केलेल्या या मागणीला आपला विरोध असल्याचं खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शहराच्या नामकरणाच्या मागणीवरून बारणे कुटुंबियातील विसंवाद चव्हाट्यावर आला.
दुसरीकडे या मागणीला नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला नाही. मात्र, अशा प्रकारे जाहिरातबाजीवर लाखो रुपये खर्च करून अचानक केल्या गेलेल्या या मागणीचे काही राजकीय अर्थ जरूर आहेत. त्यापैकी एक म्हणजे ही मागणी पुणे जिल्ह्याचं विभाजन करून शिवनेरी नावाचा स्वतंत्र जिल्हा करू या भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या मागणी नंतर करण्यात आली आहे.
अर्थात अशा नावाचा नवा जिल्हा झाला तर तो भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.
मात्र, मग नव्या जिल्ह्यात मावळ लोकसभा नसेल आणि असं झालं तर खासदार बारणे यांना मोठा फटका बसणार हे स्पष्ट आहे. असं होऊ नये म्हणूनच जिल्हा उभारण्यापेक्षा शहराचं नावं बदलून आपला मतदार संघ सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न बारणे कुटुंबियांकडून केला जात असल्याचं बोलल जात आहे. त्यामुळे भाजपचे आमदार आजही आपल्या मागणीवर ठाम राहून शहराच नावं नाही तर नवा जिल्हाच स्थापन करा असं म्हणत आहेत. औरंगाबादचं नामांतर करून छत्रपती संभाजीनगर त्यानंतर उस्मानाबादचे नामकरण करून धाराशिव आणि नुकतच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केल्या गेलं. पण या तीनही शहरांचे नामकरण करण्यासाठी एक पार्श्वभूमी होती. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवडचे नामकरण का? हा प्रश्न अनुत्तरीत राहत असला तरीही यावरून राजकारण रंगणार हे मात्र नक्की.