उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येणार ; नागपुरातील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्यातील संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांचं काय होणार याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळ येऊच देणार नाहीत. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येणार आणि महाविकास आघाडी तुटेल, असा दावा काँग्रेसचे निलंबित नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालांनतर अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अपात्रतेची ही कारवाई सहा वर्षांसाठी असणार आहे. त्यामुळे अनेकजण राजकारणातून बादही होतील, असं देशमुख यांनी म्हटलं.
कोणताही राजकीय नेता किंवा पक्ष आपल्या आमदारांना अपात्र होताना पाहणार नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना आगामी काळात एकत्र येतील. अपात्रेविषयीचे ताांत्रित मुद्दे पाहिले असता कुणालाही राजकारणातून बाद व्हायला आवडणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत एकमेव मार्ग उरला असेल तो म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र येणे, असंही त्यांनी म्हटलं.
त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही नेते एकत्र आले तर कुणीही अपात्र होणार नाही. दोन्ही नेत्यांकडे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याच्या महाविकास आघाडीच्या वाटाघाटीला काहीही अर्थ नाही. दोन्ही नेते एकत्र येतील आणि ती शिवसेना भाजजसोबत जाईल, असा मोठा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.