अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन, बॉलिवूडला धक्का….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बॉलिवूडला एक धक्का बसला आहे. बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन झाले. त्यांचे वय फक्त 50 वर्षे होते. त्यांनी जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या जाण्याने सिनेजगतात शोककळा पसरली आहे.
जावेद खान अमरोही यांना 2001 मध्ये आलेल्या ‘लगान’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. याशिवाय ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘चक दे इंडिया’मधील त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. जावेद खान यांनी ‘मिर्झा गालिब’ या टीव्ही सीरियलमध्येही काम केले होते.
जावेद खान अमरोही यांनी झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्समध्ये अभिनय विद्याशाखा म्हणूनही काम केले आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी ‘चंद्रकांता’चे अखिलेश मिश्रा यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवरून दिली, त्यानंतर सर्वत्र शांतता पसरली.
जावेद खान अमरोही यांचा जन्म मुंबईत झाला. बॉलीवूडमध्ये सहाय्यक भूमिकांसोबतच त्याने कॅमिओ देखील केले. जवळपास 150 हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांवर वेगळी छाप सोडली. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी स्टारर ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटात पोलीस हवालदाराची भूमिका करून त्याने सर्वांना हसवलं होतं केल्या.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….