सुपारी घेऊन राज ठाकरे RSSची कामं करताहेत…? संभाजी ब्रिगेडचा आरोप…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांच्या या विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.
त्यामुळे राज्यपाल चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्यपाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड प्रचंड आक्रमक झाले आहेत.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी आज पत्रकांरांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शिवाजी महाराजांची बदनामी कदापी सहन केली जाणार नाही, शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक गिळून गप बसतात”.
“महाराज जगाची अस्मिता आहेत आणि त्यांचीच बदनामी सगळे करतायत, राज्यपाल कोश्यारी अश्या जर विकृत भाषेत विधान करत असतील तर त्यांना महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही त्यांनी महाराष्ट्रात राहता कामा नये” अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज आखरे यांनी दिली आहे.
ते पुढं म्हणाले कि, “सुधांशू त्रिवेदी डोक्यावर पडलेला आहे, भाजपच्या लोकांनी डोळ्यात तेल घातलं नाही का? त्रिवेदीची हकालपट्टी केली पाहिजे होती, शिवाजी महाराजांची विचारांची भाजप फक्त वाणी करतं पण कृती मध्ये मात्र काही नाही, भाजपचं सरकार आलं की असे चित्रपट का निघतात असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, “राज ठाकरेंनी खोटा इतिहास पेरण्याची सुपारी घेतली आहे का? छत्रपतींचा इतिहास जिथं गेला तिथं राज ठाकरे आहेत. छत्रपती सगळ्या जातीचे आहेत, हिंदू आणि मुस्लिम दंगली पसरवण्याचं काम त्यांनी केलं आहे, तर राज ठाकरे सुपारी घेऊन आरएसएस (RSS) चे काम करत आहेत का” असे प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले.