पोलीस भरतीबाबत देंवेद्र फडणवीसांची मोठी घोषणा, 20 हजार पदांसाठी लवकरच जाहिरात निघणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गृहविभागाची महत्त्वपूर्ण बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली, तसेच काही निर्णय देखील घेण्यात आले आहे.
या बैठकीत पोलीस भरतीबाबत झालेल्या चर्चेची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पोलिसांच्या 20 हजार पदांसाठी भरती लवकरच घेतली जाणार आहेत आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा यामुळे मिळाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसोबत चर्चा करुन दोन वर्षांतील पोलीस भरती लवकरच घेतली जाणार आहे. एकूण 20 हजार पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. आठ हजार पदांसाठी आधीच जाहिरात निघाली आहे. आता लवकरच 12 हजार पदांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. पोलीस दलाल यामुळे निश्चित फायदा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सायबर सिक्युरिटीबाबत आढावा
सायबर सिक्युरिटीबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता याबाबत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याबाबत पावलं उचलली जाणार आहेत. सायबर गुन्ह्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता. प्रकल्प गुजरातला जात असताना आम्ही त्यांना भेटलो. ज्या काही हालचाली झाल्या त्या आमच्या सरकारच्या काळात झाल्या आहेत. सध्या विरोधक आंदोलन करुन नौटंकी करत आहेत. आम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक आणून त्यांना जशास तसं उत्तर देऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
सध्या नवरात्रीत गरब्यासाठी दोन दिवस आम्ही 12 वाजेपर्यंत दिले आहेत. आणखी एक दिवस वाढवून द्या. याबाबत गृहविभागाकडून एक प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं…