शिवसेना मेळाव्यावरून शिवसैनिकांना अजित पवारांचा सबुरीचा सल्ला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघडी सरकार कोसळलं तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आजही सुरूच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली आहे.
तर उद्धव ठाकरेंना या मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात शिंदे गट सर्वेच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती शिंदे गटाचे वकील उत्सव त्रिवेदी यांनी दिली आहे.
या निर्णयावर अजिर पवार म्हणाले की ” बाळासाहेब म्हणाले होते ,माझ्या नंतर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख म्हणून काम पाहतील. आणि तुम्हा त्यांच्या पाठिशी उभे राहा. जर देशामध्ये कुठेच न्याय मिळाला नाही तर, आपण न्याय व्यवस्थेकडे जातो. त्यानंतर न्यायपालिका त्या बाबतीतल निर्णय देते, त्यानुसारच शिवसेनेला न्याय मिळाला आहे. त्यावर मी मनापासून समाधान व्यक्त केरतो.”
अजित पवार पुढं म्हणाले ज्या लोकांना शिंदे गट म्हणून शिंदेचे विचार ऐकायचे असतील त्यांनी BKC वर जावा. आणि ज्यांना शिवसेना म्हणून उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे असतील. त्यांनी शिवाजी पार्क मैदानावर जावा. पण मला काळजी आहे, फक्त मिडीयाची कारण सभा सुरू झाल्यावर TV वर दाखवायच कोणाला आसा प्रश्न त्यांच्या समोर येईल अस म्हणल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला
शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगीसाठी अर्ज केले असताना. कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. असे म्हणत मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते.