बारामतीत सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र बारामतीकर पवारसाहेबांना सोडणार नाही :- जयंत पाटील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती त्यांना नाही. त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार ( ajit pawar ) यांना मिळतेच.
बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल. परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही. एवढं ते घट्ट नातं बारामतीकर आणि पवार कुटुंबीयांचं आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील (jayant patil) यांनी सांगितलं. एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारसाहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. मीडियाशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी भाजप आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
बारामतीत उमेदवार कोण द्यायचा हे भाजप ठरवेल. बारामती सध्या भाजपने टार्गेट केली आहे. शिवाय आमच्याकडेही टार्गेट केले आहे. असं वातावरण तयार करायचं की आम्ही सर्वात मोठ्या लोकांना टार्गेट करतोय अशी भाजपची मीडियासमोर जाण्याची पद्धत आहेत. मात्र थोड्या दिवसात आमचाही प्लॅन मांडला जाणार आहे. त्यावेळी कुणाकुणाला टार्गेट करतोय हे तुमच्याही लक्षात येईल, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
भाजपची लोकप्रियता कमी होतेय
यावेळी त्यांनी भाजपच्या लोकप्रियतेवरूनही टीका केली. सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून ते अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागलीय हे लक्षात यायला लागले आहे. जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते, अशी टीकाही त्यांनी केली.
ते बावनकुळेंना शोभत नाही
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले होते. ते का नाकारले याची चर्चा करु इच्छित नाही. परंतु बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पध्दतीने बोलणं त्यांना शोभत नाही, असंही ते म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…