इतिहास 8 ऑगस्टचा ; महात्मा गांधीच्या चळवळीने ब्रिटिश राजसत्ता हादरली होती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजचा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो.
08 ऑगस्ट या दिवसाला भारतीय इतिहासात वेगळ स्थान आहे. हा दिवस स्वातंत्र्याच्या शेवटच्या युद्धाचा शंख म्हणून स्मरणात ठेवला जातो.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चालवलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा पाया या दिवशी घातला गेला. यानंतर संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध एकवटला आणि ब्रिटिश सरकारला गुडघे टेकावे लागले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. मुंबईतील ज्या मैदानावर ध्वजारोहनची सुरुवात झाली ती जागा क्रांती मैदान म्हणून ओळखली जाऊ लागली.
दुसऱ्या महायुद्धात भारताची मदत घेऊनही इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्याचे वचन पाळले नव्हते. अशी १९४२ ची ही गोष्ट आहे. (IndiaAt75) तेव्हा देशभर गांधीजींनी ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केले होते. 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात या आंदोलनाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु त्यानंतर गांधींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये कैद करण्यात आले आणि जवळपास सर्व नेत्यांना अटक करण्यात आली होती.
अशा स्थितीत युवा नेत्या अरुणा आसिफ अली यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवून ‘भारत छोडो’ आंदोलनाचा झेंडा उंचावला होता. गांधीजींनी अहिंसक आंदोलन पुकारले असले तरी या आंदोलनामुळे देशात अनेक ठिकाणी तोडफोड आणि हिंसाचारच्या घटना घडल्या होत्या. दुसर्या महायुद्धातून इंग्रजांचे कंबरडे मोडले होते आणि या चळवळीने ब्रिटीश राजवटीच्या शपेटीत शेवटचा खिळा ठोकला गेला होता.
देशात दरवर्षी हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली जाते. यासोबतच महात्मा गांधींनी म्हणजेच बापूंनी दिलेली शिकवण आठवते जी सध्याच्या काळात देश विसरत चालला आहे.