मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत ; ही फार मोठी शोकांतिका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन जवळपास महिना झाला आहे. मात्र तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने दिल्लीत जात आहे.
तरी देखील यावर अद्यापही शिक्कामोर्तोब झालेला नाही. यावरून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेऊन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ स्थापन करू शकत नाही ही राज्याच्या दृष्टीने फार मोठा शोकांतिका आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर 90 हुन अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर साठेआठ लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय या सरकारने अद्याप घेतलेला नाही. मंत्रिंडळाच्या विस्ताराच्या नावाखाली त्यांना सारखंसारखं दिल्लीला जावं लागत आहे. दिल्लीश्वरांची मर्जी राखावी लागत आहे. तरीदेखील दिल्लीतून मंत्रिमंडळ विस्ताराचा हिरवा कंदील मिळत नाही. किती दिवस दिल्लीत जाऊन स्वत: चा अपमान करून घेत आहात. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेते एवढं मोठं बंड करून नवीन सरकार स्थापन केले मात्र आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही. हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले. तर राज्यातील परिस्थितीचा विचार करून किंवा कोणताही गोंधळ न करता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी काल केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली होती.
दरम्यान, तसेच मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्री यांचा परवाचा दिल्ली दौरा अचानक पणे रद्द झाल्याने भाजप आणि शिवसेनेत नेमकं काय चाललंय? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असताना सेनेचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल दिल्ली गाठली. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्याने अब्दुल सत्तार यांनी दिल्ली गाठल्याचे सांगण्यात येत आहे.