भीषण वास्तव ; शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून 24 दिवसाच्या कार्यकाळात 89 शेतकऱ्यांची आत्महत्या ; यवतमाळमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी केली आत्महत्या….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई,24 जुलै :- शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर केला होता.
मात्र गेल्या 23 दिवसांमध्ये राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही 24 दिवस उलटले तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्याला अजूनही कोणत्याही खात्याला मंत्री मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर करूनही राज्याला 24 दिवसांत कृषिमंत्री मिळाले नाही.
मागील 23 दिवसांमध्ये राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. औरंगाबाद, बीड, यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या केल्याची वृत पत्रकारांनी समोर आणले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा केल्या आहे. आतापर्यंत शिंदे आणि फडणवीस यांनी तीनवेळा मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्यात.
या बैठकांमध्ये शहरांचं नामांतर, थेट सरपंच निवडणूक, आरे कारशेड, एमएमआरडीएच्या कर्जाची घोषणा केली आहे, पण अजूनही शेतकऱ्यांना दिलासा देणारी कोणताही घोषणा सरकारने केली नाही. राज्यात आधीच अस्मानी संकट आले असताना कृषि खात्याचा कारभार अजूनही वाऱ्यावरच आहे. राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन केले.
पण या दोन्ही योजना मंत्रालयातच अडकलेल्या आहे. 1 जानेवारी ते जून या 6 महिन्या मराठवाड्यात 306 आणि विदर्भामध्ये 368 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, यावेळी एकनाथ शिंदे हे त्या सरकारमध्येच होते. एवढंच नाहीतर कृषिमंत्री सुद्धा शिंदे गटात असलेले दादा भुसे हेच होते. मागील 23 दिवसांमध्ये सर्वाधिक आत्महत्या या औरंगाबाद जिल्ह्यात केल्या आहेत. त्यापाठोपाठ बीडमध्ये 13 आणि यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. परभणी 6, जळगाव 6, जालना 5, बुलडाणा 5, उस्मानाबाद 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 3, नांदेड 2 आणि भंडारा-चंद्रपूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.