शिवसेनेची मोठी खेळी ; शिंदे गट विधानभवनात पोहोचण्याआधीच कार्यालयाचे “दार” केले बंद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 03 जुलै :- एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता विधानभवनातील शिवसेनेचे (shivsena) कार्यालय बंद करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार पाडले. या बंडखोरी नाट्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना आमदार आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे विधानभवनातील कार्यालय बंद करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या मतभेदांमध्ये हे कार्यालय बंद करण्यात आलं आहे. ती कोणाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, शिंदे गटाकडून कार्यालयावर ताबा मिळवण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेनं हे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान,राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला आहे.
या व्हीपमध्ये भाजपचे नेते राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहे. तसंच 2 तारखेला ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे. तर आमदारांनी प्रतोद म्हणून नियुक्त केले होते भरत गोगावले यांचेही पक्षादेशावर नाव आहे.
या पत्राद्वारे एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष त्यांचाच असल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीकडूनही व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेनं प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाही तो लागू असणार आहे. मात्र, आमच्याकडे पुरेस संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेला व्हीप लागू होणार नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….