जन धन खाते धारकांसाठी मोठी बातमी ; केंद्र सरकार कडून मिळणार मोठा लाभ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 20 जून :- जन धन खातेधारकांसाठी एक गुड न्यूज आहे. जर तुम्हीही हे खाते उघडले असेल तर आता तुम्हाला दरमहा 3000 रुपये मिळतील. कोणत्याही योजनेंतर्गत सरकार थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करते, त्या सर्व योजनांचे पैसे प्रथम जन धन खात्यात हस्तांतरित केले जातात.
खातेदारांना 3000 रुपये मिळतील प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत (PM Shram Yogi Mandhan Yojna) सरकार जन धन खातेधारकांना दरमहा पूर्ण 3000 रुपये ट्रान्सफर करते. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. जन धन खातेदारालाही या योजनेचा लाभ मिळतो. केंद्र सरकारच्या मानधन योजनेत 18 वर्षे ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.
जेव्हा एखादी व्यक्ती 60 वर्षांची होते, तेव्हा या योजनेचे पैसे त्याच्याकडे हस्तांतरित केले जातात. यामध्ये वर्षाला 36000 रुपये ट्रान्सफर होतात. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. UPI आणि क्रेडिट कार्ड लिंक करुन वाढवू शकता तुमचा क्रेडिट स्कोअर; चेक करा कसं? योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो.
पथ विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय तुमचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. RBI कडून ‘या’ बँकेचा परवाना सस्पेंड, तुमचंही बँकेत खातं असेल तर काय परिणाम होईल? या कागदपत्रांची आवश्यकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमचे जन धन खाते असणे देखील आवश्यक आहे.
तुम्हाला तुमचे बचत खाते तपशील देखील सबमिट करावे लागतील. या योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला विविध वयोगटानुसार 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागते. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील. या योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बचत बँक खात्याचा किंवा जन धन खात्याचा IFS कोड आवश्यक असेल. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड आणि वैध मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.