विधान परिषदे आधी भाजपला धक्का ; मोठ्या नेत्यांचा मुलगा गेला “राष्ट्रवादीत”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई,18 जून :- विधान परिषद निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण, त्याआधी भाजपला धक्का बसला आहे. उस्मानाबाद येथील भाजपचे नेते दिग्विजय शिंदे (BJP leader Digvijay Shinde) यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजि पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे, दिग्विजय शिंदे यांच्या वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. ‘दिग्विजय शिंदे यांनी गेली अनेक वर्षे भाजपात काम केलं.
आलेल्या अनुभवानंतर ते NCP मध्ये प्रवेश करत आहेत. वडिलांपासून फारकत घेऊन दिग्विजय शिंदे यांनी NCP प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसंच, मित्र पक्षांकडून कोणी येत असेल तर आम्ही नाही म्हणून सांगतो. पण भाजपकडून येत असेल तर Express way मोकळा आहे, असं सूचक विधानही जयंत पाटील यांनी केलं.
तर, दिग्विजय शिंदेंसोबत अनेक सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. इतके वर्ष एका पक्षात काम करणे आणि अचानक भूमिका बदलून पक्ष बदलणे हे एक आव्हान आहे. तरी वडील भाजपमध्ये असताना त्याने राष्ट्रवादीमध्ये येण्याचा ठरवलं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो, असं अजित पवार म्हणाले. ‘शरद पवार यांच्यासोबत काम करणारे लोक आम्हाला सोडून गेले.
काही वैचारिक मतभेद त्यांचे असतील मात्र आता ते जरी सोडून गेले तरी त्या ठिकाणचा विकास अपल्याला करायचा आहे, असं अजित पवार म्हणाले. ‘एक तरुण म्हणून धनंजय मुंडेंचं उदाहरण आपण घ्या नेतृत्व गुण बघून ते आमदार झाले मंत्री झाले आणि आता तरुण सहकारी म्हणून आमच्यासोबत आहेत, असं म्हणत अजितदादांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं. ‘तीन पक्षाचा सरकार म्हटल्यावर काही नाराजी असते पण सरकार चाललं पाहिजे आमदारांची नाराजी नसू नये त्यात विकास कामासाठी एकत्रितपणे निर्णय सरकार म्हणून घेतले जातात. प्रत्येक पक्ष त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आपला पक्ष वाढविण्यासाठी काम करतोय, असंही अजित पवारांनी सांगितलं.