भाजपाच्या रणनीती विरोधात राष्ट्रवादी वापरणार “खड़से कार्ड” ; संध्याकाळी महत्वाची बैठक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 18 जून :- विधानपरिषद निवडणुकीला आता दोनच दिवस उरले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यासोबत बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये भाजप ज्या प्रकारे आमदारांवर दबाव टाकत आहे, त्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी सर्व आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी 11 उमेदवार मैदानात उतरल्यामुळे चुरस वाढली आहे. आता महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला आहे.
काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप (bhai jagatap) यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील या बैठकीत उपस्थितीत होते. या बैठकीनंतर भाई जगताप यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ‘राज्यसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला मान्य आहे.
पण अपघात नेहमी होत नाही. पवार साहेब अनुभवी नेते आहेत. आता सर्व उमेदवार जिकून येतील. आम्ही महाविकास आघाडी तयारी करत आहोत.
आमचा विरोधक फक्त भाजप आहे. राज्यसभा निवडणुकीत चुका झाल्या आता होणार नाहीत, असा विश्वास भाई जगताप यांनी व्यक्त केला. तर, आज संध्याकाळी 7 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्व आमदार आणि मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल. सर्व आमदारांना यावेळी मार्गदर्शन केलं जाईल.
अपक्ष, समर्थक आमदार उपस्थित असतील. पक्षाचे गटनेते आणि नेते परवा मतांबाबत आमदारांना सूचना करतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी दिली. तसं, भाजप कशाप्रकारे आमदारांवर दबाव टाकतात, हे स्वतः मी पाहिलेलं आहे कारण मी 25 वर्षे भाजपमध्ये होतो. माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे की तुम्ही भाजपचे आमदार सांभाळा कारण एकनाथ खडसे यांना नेमकं ते काय करतात हे माहिती आहे.
प्रेशर टॅकटिक कसं करायचं हा त्यांचा जुना उद्योग आहे, असंही अनिल पाटील म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत आमचे 6 उमेदवार विजयी होतील – दिलीप वळसे पाटील ‘आम्ही नेहमीच शरद पवार यांना भेटत असतो. अनेक विषय सांगायचे असतात. मार्गदर्शन घेत असतो.
राज्यातील काही विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा झाली, विधान परिषद निवडणुकीत आमचे 6 उमेदवार आहेत. ते सगळे निवडून येतील, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. ‘सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे की, पवार कुटुंबीयांपासून आम्हाला धोका आहे. परंतु माझ्या माहितीनुसार त्यांच्या जीविताला धोका आहे, असं मला काही वाटत नाही..
पण त्यांची काळजी पाहता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा सूचना दिल्या आहेत, अशी माहितीही वळसे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक गाडी घुसली होती. हा प्रकार अनावधानाने घडला होता. त्यात हेतुपुरस्सर काही झालं, असं नाही. पण, पोलीस सुरक्षा कुठे कमी पडली का ? याचा तपास सुरू आहे. काही त्रुटी आढळल्या आढळल्यास कारवाई होईल, अशी माहितीही वळसे पाटील यांनी दिली.